![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/50/Bhagawanbaba.png/640px-Bhagawanbaba.png&w=640&q=50)
भगवानबाबा
मराठी संत / From Wikipedia, the free encyclopedia
संत भगवानबाबा (जन्म : २९ जुलै, १८९६ मृत्यू : १८ जानेवारी, १९६५) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत आहेत. यांचे पूर्ण नाव आबाजी तुबाजी सानप पाटील होते.
संत भगवानबाबा | |
![]() | |
मूळ नाव | आबाजी तुबाजी सानप |
जन्म | २९ जुलै १८९६ (1896-07-29) सुपे सावरगाव, पाटोदा, बीड, महाराष्ट्र |
निर्वाण | १८ जानेवारी, १९६५ (वय ६८) रुबी हॉल क्लिनिक, पुणे |
गुरू | • संत एकनाथ, • संत तुकाराम, • गीतेबाबा दिघुळकर, • सीताराम बाबा महाराज (वागिरा गाव), • माणिकबाबा, • बंकटस्वामी |
शिष्य | भीमसिंह महाराज |
संबंधित तीर्थक्षेत्रे | भगवानगड,सोनगिरी |
राष्ट्रसंत भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ , तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटकातील काही भाग व पश्चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी वार्षिक नारळी सप्ताहाची स्थापना केली.[1]