भगवानगड
खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेले देवस्थान / From Wikipedia, the free encyclopedia
श्रीक्षेत्र "भगवानगड" (अक्षांश १९°१२’उत्तर, रेखांश ७५°२४’ पूर्व) हे महाराष्ट्र राज्यातील बीड-अहमदनगर जिल्ह्यांतील सीमेवर असलेल्या, खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेले निसर्गरम्य देवस्थान आहे. या निसर्गरम्य देवस्थानलगतच राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते विशाखापटणम हा जातो. महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र भगवानगड हे ओळखले जाते. या ठिकाणी विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे मंदिर आहे. तसेच जनार्दनस्वामी, भगवानबाबा व भीमसिंह महाराज यांच्या समाध्या येथे आहेत. सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिले जाते. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून श्री क्षेत्र भगवानगडाकडे बघितले जाते.हा गड वारकरी संप्रदायातील ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा यांनी बांधला आहे. भगवानबाबा हे थोर वारकरी संप्रदायाचे संत होते. भगवानबाबांच्या निधनानंतर वारकरी संप्रदायातील संत भीमसिंह महाराज गादीवर बसविले. आता वारकरी संप्रदायातील संत श्री डाॅ नामदेव महाराज शास्त्री गादीवर बसविले आहेत. हे वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे की येथे जातीभेद,वर्णभेद,धर्मभेद,लिंगभेद नाही.त्यामुळेच विठ्ठलाचे विटेवर चरण समान आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
भगवानगड | ||
नाव: | श्रीक्षेत्र भगवानगड | |
---|---|---|
निर्माता: | संत भगवानबाबा | |
जीर्णोद्धारक: | मंहत डॉ .न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री | |
निर्माण काल : | 1951 & 53 | |
देवता: | विठ्ठल, धौम्य ऋषी | |
वास्तुकला: | हिन्दू | |
स्थान: | महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुका | |