वासंती (चित्रपट अभिनेत्री)

भारतीय बाल अभिनेत्री From Wikipedia, the free encyclopedia

वासंती विनायक घोरपडे - सासरच्या वासंती इंदुभाई पटेल (१६ फेब्रुवारी, १९२२[1] - ६ ऑक्टोबर, २०२४[2]) या मराठी चित्रपटांत भूमिका करणाऱ्या पहिल्या गायक बालकलावंत होत्या.

या लेखातील किंवा विभागातील मजकूर of http://m.loksatta.com/lokrang-news/well-known-child-actor-vasanti-patel-1088998/ - See more at: http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:HRRl1AAcvKEJ:m.loksatta.com/lokrang-news/well-known-child-actor-vasanti-patel-1088998/+&cd=1&hl=en&ct=clnk&gl=in#sthash.i1XeoTul.dpuf येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.



१९१७ मध्ये बाबूराव पेंटरांनी कोल्हापूरला महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. त्या कंपनीला वासंतीच्या मावशी, तानीबाई कागलकर, यांनी अर्थसाहाय्य केले होते. तानीबाईंचा विवाह कोल्हापूरच्या महाराजांच्या भावाशी झाला होता. त्या उस्ताद अल्लादिया खान साहेबांच्या ज्येष्ठ शिष्या होत्या. उत्कृष्ट शास्त्रीय गायिका असल्या तरी, राजघराण्याशी संबंधित असल्याने त्या गायनाचे कार्यक्रम कधीच करत नसत. वासंतीबाईंचे वडील विनायकराव घोरपडे वकील होते. सर्व घोरपडे मंडळी महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या आवारातच एका प्रशस्त बंगल्यात राहत होती. त्या बंगल्यात त्या काळी चित्रणही होत असे. इ.स.१९२२ मध्ये जन्मलेल्या वासंतीला पाळण्यात असतानाच बाबूराव पेंटरांनी त्यांच्या ‘कृष्णजन्म’ (१९२२) व ‘मुरलीवाला’ (१९२२) या मूकपटांत बालकृष्ण बनवले, आणि तेथपासूनच वासंतीचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला.

१ जून १९२९ रोजी विष्णूपंत दामले, व्ही. शांताराम, केशवराव धायबर (वासंतीबाईंच्या आत्याचे यजमान), शेख फत्तेलाल व सीतारामपंत कुलकर्णी यांनी प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली. १९३२ मध्ये ‘अयोध्येचा राजा’ या बोलपटाच्या निर्मितीनंतर, चांगला वीजपुरवठा, प्रशस्त जागा व अधिक सुखसोयींसाठी प्रभातने कोल्हापूर सोडून पुण्याला स्थलांतर केले. वासंतीबाई ह्या त्यांच्या मूकपटांतून व बोलपटांतून छोट्यामोठ्या भूमिका करत असत. १९३२ साली निघालेल्या ‘मायामच्छिंद्र’मध्ये स्त्रीलंपट, पण भित्र्या शंखनादाच्या (नट -राजाराम बापू पुरोहित) कन्येची भूमिका वासंतीने केली होती. तसेच ‘बजरबट्टू’ (१९३०) या मूकपटामध्येही वासंतीबाई होत्या.

प्रभातच्या ‘महात्मा’ (नंतरचे नाव ‘धर्मात्मा’) चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी शांताराम बापूंनी वासंतीमधील कलागुण हेरून तिला राणू महाराच्या (वसंत देसाई) मुलीची- जाईची आव्हानात्मक भूमिका दिली. वास्तविक वासंतीने अभिनय, नृत्य आणि गायनाचे तसे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते; तिला या सर्वाची नैसर्गिक देणगी होती. संत एकनाथांनी आपल्या घरी जेवायला येण्याचे मान्य केल्यावर हर्षभरित झालेली जाई (वासंती) ‘उद्या जेवायला येणार नाथ आमच्या घरी’ गात, नाचत, बागडत रस्त्यातून धावत जाते. वासंतीने हा प्रसंग इतका सुरेख आणि सहज साकार केला, की भल्याभल्यांनी तिच्या अभिनयाला भरभरून दाद दिली. एका हरिजन मुलीची अप्रतिम भूमिका साकार केली म्हणून स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वासंतीची पाठ थोपटली होती.

'धर्मात्मा'च्या एका दृश्यात जाई रडता रडता हसते, हसता हसता रडते. अल्लड वयाच्या वासंतीला रडूच येईना. शांताराम बापूंनी फटकन चपराक दिली. आश्चर्य आणि दुःखाने रडणारी 'जाई' कॅमेऱ्याने केव्हा टिपली ते कळलेच नाही. ते दृश्य चित्रपटात फार प्रभावीपणे उतरले आहे.

पुढची कारकीर्द

पगारावर नेमणूक

संगीताचे शिक्षण आणि ध्वनिमुद्रण

नाट्यसृष्टीत प्रवेश

अखेरचा चित्रपट आणि विवाह

वासंतीची भूमिका असलेले चित्रपट

पुरस्कार

विशेष

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.