![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/dd/Cricket_2011_map.svg/langmr-640px-Cricket_2011_map.svg.png&w=640&q=50)
क्रिकेट विश्वचषक, २०११
From Wikipedia, the free encyclopedia
इ.स. २०११ची आय.सी.सी. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा फेब्रुवारी १९ ते एप्रिल २, इ.स. २०११च्या दरम्यान भारत, श्रीलंका व बांगलादेशमध्ये खेळवण्यात आली. चौदा देश भाग घेत असलेल्या या स्पर्धेत ५० षटकांचे एक-दिवसीय सामने खेळण्यात आले.[1] फेब्रुवारी १७ रोजी उद्घाटन सोहळा होउन[2] १९ फेब्रुवारीला पहिला सामना भारत आणि
बांगलादेशमध्ये ढाका येथे शेर-ए-बांगला मैदानात खेळला गेला.[3] प्रत्येकी सात संघ असलेल्या दोन गटांत साखळी सामने झाल्यावर त्यांतील सर्वोच्च चार-चार संघानी बाद फेरीत भाग घेतला. एप्रिल २ रोजी मुंबईच्या वानखेडे मैदानात खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव करीत विश्वविजेतेपद मिळवले. यजमान संघाने विश्वविजेतेपद जिकण्याची ही प्रथमच वेळ आहे.
आयसीसी क्रिकेट विश्वचषक, २०११ | |||
---|---|---|---|
![]() क्रिकेट विश्वचषक, २०११, नकाशा | |||
तारीख | १९ फेब्रुवारी २०११ – २ एप्रिल २०११ | ||
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन | ||
क्रिकेट प्रकार | एकदिवसीय सामने | ||
स्पर्धा प्रकार | साखळी सामने व बाद फेरी | ||
यजमान |
![]() ![]() ![]() | ||
विजेते |
![]() | ||
सहभाग | १४ (१०४ देशातून) | ||
सामने | ४९ | ||
मालिकावीर |
![]() | ||
सर्वात जास्त धावा |
![]() | ||
सर्वात जास्त बळी |
![]() ![]() | ||
अधिकृत संकेतस्थळ | आयसीसी विश्वचषक | ||
|
या विश्वचषकाचे यजमानपद भारत, श्रीलंका आणि बांगलादेश बरोबरच पाकिस्तानलाही मिळणार होते पण २००९मध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर लाहोरमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आय.सी.सी.ने पाकिस्तानकडून यजमानपद काढून घेतले[4] आणि संयोजन समितीचे मुख्यालय लाहोरहून मुंबईला हलवण्यात आले.[5] पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेले १४ साखळी सामने व एक उपांत्य सामना इतर यजमान देशांत खेळण्यात आले.[6] पैकी आठ सामने आणि उपांत्य फेरी भारत तर चार साखळी सामने आणि दोन साखळी सामने प्रत्येकी श्रीलंका आणि बांगलादेशात खेळले गेले.[7]
या स्पर्धेत आयर्लंडने
इंग्लंडचा केलेला पराभव सगळ्यात मोठा धक्कादायक निकाल होता.[8] आयर्लंडच्या केव्हिन ओ'ब्रायनने ६३ चेंडूत ११३ धावा काढीत विश्वचषकांतील सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा मॅथ्यू हेडनचा विक्रम आपल्या नावावार करून घेतला.[9] श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानने स्पर्धेत सर्वात जास्त ५०० धावा काढल्या तर भारताच्या झहीर खान आणि पाकिस्तानच्या शहीद आफ्रिदीने प्रत्येकी सगळ्यात जास्त बळी (२१) मिळवले. युवराजसिंग स्पर्धावीर ठरला.