From Wikipedia, the free encyclopedia
वरंगल (किंवा वारंगल / वारंगळ - Warangal) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या वरंगल जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. येथील पुरातत्त्वीय अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले वरंगळ शहर तेलंगणाच्या उत्तर भागात वसले असून ते हैदराबादच्या १४० किमी ईशान्येस आहे. २०११ साली ८.११ लाख लोकसंख्या असलेले वरंगळ हैदराबादखालोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर होते.वारंगळ ही काकत्य राजवटीची राजधानी होती. हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत (१९४९) हा प्रदेश असफझाई निजामांच्या अखत्यारीत होता.[1]
वारंगल వరంగల్ |
|
भारतामधील शहर | |
गुणक: 18°0′0″N 79°34′48″E |
|
देश | भारत |
राज्य | तेलंगण |
जिल्हा | वरंगळ जिल्हा |
समुद्रसपाटीपासुन उंची | ९९१ फूट (३०२ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ८,११,८४४ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
वरंगळ येथील राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान ही एक प्रमुख शैक्षणिक संस्था असून काकतीय विद्यापीठ हे येथील प्रसिद्ध विश्वविद्यालय आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या ६,१५,९९८ होती. एकूण लोकसंख्येमध्ये ३०८,५०९ पुरुष आणि ३०७,४८९ स्त्रिया आहेत. वारंगळ शहराची लोकसंख्या ६१५,९९८ असली तरी; त्याची शहरी/महानगरी लोकसंख्या ७५३,४३८ आहे ज्यापैकी ३७७,९४३ पुरुष आणि ३७५,४९५ महिला आहेत. लिंग गुणोत्तर १,००० पुरुषांमागे ९९७ स्त्रिया. ०-६ वर्षे वयोगटातील ५९,१९५ मुले आहेत, त्यात ३०,३८० मुले तर 2८,८१५ मुली होत्या, ०-६ वर्षे वयोगटातील लिंग गुणोत्तर १,००० मुलेमागे ९४८ मुली आहे. ४,६३,८०१ साक्षरांसह सरासरी साक्षरता दर ८३.३०% होता.
वरंगलमधील धर्म[2] | ||||
---|---|---|---|---|
धर्म | टक्के | |||
हिंदू | 83.41% | |||
मुस्लिम | 14.39% | |||
ख्रिश्चन | 1.65% | |||
इतर† | 0.55% | |||
†शीख, जैन यांचा समावेश आहे |
८३.४१% लोक हिंदू आणि (१४.३९%) मुस्लिम होते. इतर धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये ख्रिश्चन (१.६५ %), शीख (०.१५%), बौद्ध (०.०१%), जैन (०.०३%) आणि कोणताही धर्म नसलेले (०.३५ %) यांचा समावेश होतो.[3]
तेलुगू वरंगलमध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.
हे शहर रस्ते आणि रेल्वे मार्गांनी प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. शहरातून जाणारे राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग हे, राष्ट्रीय महामार्ग १६३, हैदराबाद आणि भोपालपट्टणमला जोडणारा; रामागुंडम आणि खम्मम यांना जोडणारा NH ५६३ आहेत. वरंगल येथे TSRTC (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ) हे सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवते.[4][5]
वारंगलमध्ये भारतीय रेल्वेच्या महत्त्वाच्या नवी दिल्ली-चेन्नई मुख्य मार्गावर काझीपेट आणि वारंगल ही दोन रेल्वे स्थानके आहेत. ती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या सिकंदराबाद रेल्वे विभागाच्या अखत्यारीमध्ये येतात.[6]
वरंगलमध्ये निजामांनी १९३० मध्ये ममनूर येथे विमानतळ बांधले आहे. १,८७५ एकर जमीन, ६.६ किमी धावपट्टी, पायलट आणि स्टाफ क्वार्टर, पायलट प्रशिक्षण केंद्र आणि एकापेक्षा जास्त टर्मिनल असलेले हे अविभाजित भारतातील सर्वात मोठे विमानतळ होते. परंतु आजच्या घडीला तेथे प्रवासी सेवा उपलब्ध नाही.[7]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.