पालघर
पालघर जिल्ह्याचे मुख्य शहर / From Wikipedia, the free encyclopedia
पालघर हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचे मुख्य शहर आहे. ते ठाणे शहरापासून ५२.३ किमी व महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून ७४ किमी अंतरावर आहे,तसेच मुबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोर शहरापासून २० कि.मी अंतरावर आहे.[1].
जलद तथ्य
?पालघर जिल्हा महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• ७ मी |
जिल्हा | पालघर |
लोकसंख्या | ५२,६७७ (2011) |
खासदार | राजेंद्र गावित |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• +०२५२५ • एमएच48, एमएच ०४ |
बंद करा
सागरी-डोंगरी आणि नागरी अंग असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन, त्यामधून वेगळा झालेला पालघर हा महाराष्ट्र राज्यातला ३६वा जिल्हा १ ऑगस्ट २०१४ रोजी अस्तित्वात आला. कोकणच्या उत्तर भागास असलेला पालघर जिल्हा पूर्वेकडे असणाऱ्या सहयाद्री पर्वताच्या रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राची किनारपट्टी यादरम्यान पसरला आहे.