From Wikipedia, the free encyclopedia
सयाजीनगरी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे मुंबईला गुजरातच्या कच्छ जिल्ह्यामधील भुज शहरासोबत जोडते. ही गाडी वांद्रे टर्मिनस व भुज स्थानकांदरम्यान रोज धावते व मुंबई ते भुज दरम्यानचे ८४१ किमी अंतर १६ तास व २५ मिनिटांत पूर्ण करते. कच्छ एक्सप्रेस ही गाडी देखील ह्या दोन स्थानकांदरम्यान रोज धावते.
मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा रेल्वेमार्ग विद्युत असल्यामुळे डब्ल्यू.ए.पी.-४ हे विद्युत इंजिन सयाजीनगरी एक्सप्रेसला अहमदाबादपर्यंत नेते व त्यापुढील प्रवास डिझेल इंजिन वापरून केला जातो.
सयाजीनगरी एक्सप्रेसला १ प्रथमवर्गीय वातानुकुलित, २ वातानुकुलित २-टियर, ६ वातानुकुलित ३-टियर, ८ शयनयान, ३ अनारक्षित आणि २ ईओजी/सामानवाहतूक डबे असतात. प्रवाशांच्या मागणीनुसार यात किरकोळ बदल असतात.on demand.
गाडी क्रमांक | मार्ग | प्रस्थान | आगमन | कधी |
---|---|---|---|---|
१९११५ | वांद्रे टर्मिनस – भुज | १४:५० | ०९:२५ | रोज |
१९११६ | भुज – वांद्रे टर्मिनस | २२:१५५ | १४:०५ | रोज |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.