![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/27/Mumbadevi_temple.jpg/640px-Mumbadevi_temple.jpg&w=640&q=50)
आगरी
आगरी समाज महाराष्ट्रातील प्रमुख समाज आहे. / From Wikipedia, the free encyclopedia
आगरी समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. कर्जत,पनवेल,उरण आणी ठाणे तालुक्यातील ९५% पेक्षा जास्त गावं आगरी लोकवस्तीची आहेत.या तीन तालुक्यात सर्वात जास्त आगरी लोकसंख्या आहे. तर कल्याण,भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, रायगड, ठाणे, मुंबई,पेण,अलिबाग तालुक्यातील ८०% पेक्षा गाव आगरी लोकवस्तीची आहेत. तसेच वाडा,वसई, सुधागड, अंबरनाथ, कर्जत, मुरबाड, मुरुड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, माणगाव तालुक़्यात पण आगरी लोकावस्ती मोठया प्रमाणात आढळते.
मुंबई, ठाणे, रायगड,पालघर जिल्ह्यात आगरी समाजाची लोकसंख्या मोठी आहे.
आगरी जात क्षत्रिय आहे.मुळात समुद्राच्या जवळ राहत असल्याने आगरी माणसांना मासळी अधिक प्रिय म्हणून ते खाडीमध्ये अथवा समुद्रात जाऊन मासे पकडतात.मुळ सोमवंशाचे क्षत्रिय असलेला हा समाजाच्या मालकीचे भाताचे आगार, मिठाचे आगर असल्याने हा समाज आगरी म्हणून ओळखला जाऊ लागला. भातशेतीसोबतच गोड्या पाण्यात मत्स्यशेतीचाही व्यवसाय सुरू केला. बंगाली लोकांप्रमाणेच आपल्या घराजवळ आपल्याच शेतामध्ये तलाव खोदून त्या तलावात मत्स्यबीज सोडून मासळीची पैदास अनेक वर्षे आगरी माणूस करीत आहे. अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड या गावातील आगरी माणसे व त्यांनी निर्माण केलेले छोटे-मोठे तलाव आहेत.आगरी समाजामध्ये तरे,म्हात्रे,पाटील,भोईर,केणे,भगत,गावंड,ठाकूर,मधवी,अधिकारी,,मोकल, कडवे, दळवी, कासार,थळे, खुणे, कडव, शिंगटे, शेंडे, मढवी, साळवी घरत,माळी,शेळके, शिंगोळे, लांगी, म्हस्कर, कडू, भोपी, भालेकर आडनावाची लोक जास्त आहेत.
वैकुंठातील शेषशायी भगवान श्रीविष्णुंपासून उत्पत्ती होऊन क्षत्रियांचा सोमवंश म्हणजे चंद्रवंश उत्पन्न झाला, ह्या चंद्र वंशात नहूष नावाचा महापराक्रमी राजा होता त्यांचा विवाह शिवशंकर आणि पार्वती माता यांची पुत्री अशोकसूंदरी यांच्याशी झाला होता, पुण्याच्या बळावर नहुष राजानेइंद्रासन मिळवून स्वर्गाचे राज्य मिळाले होते. यांचा ययाति नावाचा पुत्र होता त्याचा विवाह शुक्राचार्य यांची कन्या देवयानी यांच्याबरोबर झाला होता पुढे शर्मिष्ठा नावाच्या राजकन्येशी देखील झाला, त्यांच्या वंशात काही पिढ्यांनंतर क्रमाने बळिंद्र नावाचा राजा होऊन गेला , राजा बळिंद्र यांचा विवाह राजपुत्री आगलिका यांच्याशी झाला व त्या राणी झाल्या मात्र बळिंद्र राजाच्या कैलासवासानंतर साम्राज्याच्या राजकीय किंवा वैयक्तिक कारणांमुळे राजपुत्र आगला यांचे कुटुंबीय हे दक्षिण देशात मुंगी पैठण म्हणजे आजच्या महाराष्ट्रातील अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात आले, या राजपुत्र आगला यांच्या नावावरून आगरी समाजाला आगले हे नाव पडलं , हे आगले वंशज म्हणजे आताचा पालघर, नाशिक, ठाणे, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी मध्ये राहणारे सध्याचा आगरी समाज. राजपुताना मधील जे आगरी आहेत ते आणि महाराष्ट्रातील आगरी हे भिन्न वंशिय आहेत, राजपुताना मधील आगरी हे करण ज्ञातीतील पुरुष व राजपूत स्रि पासून उत्पन्न झाले आहेत ते करणराजपुत म्हणून ओळखले जातात.
तर हे क्षत्रिय राजपुत्र आगलाचे वंशज आगले क्रमाक्रमाने कोकणात आले ,हा काळ रामायण आणि महाभारतापुर्विचा असावा ,कोकणात आल्यावर ते यज्ञोपवित संस्कार धारण करित असत मात्र कालांतराने आधुनिक काळात त्यांनी यज्ञोपवित संस्कार सोडून दिले मात्र सारलांबे येथिल काही आगरी यज्ञोपवित संस्कार करतात, आगरी समाजाचे गोत्र हे कश्यप नसुन अत्री आहे, मात्र ज्यांना गोत्र माहिती नाही ते कश्यप गोत्र सांगतात.
१३व्या शतकात सोमवंशी बिंबराजा कोकणात येण्यापुर्वी आगरी समाज मिठागरांचा व्यवसाय करत असत अगदी मौर्य आंध्रभृत्य साम्राज्याचा पुर्वीपासून आगरी समाज येथे स्थायिक आहे, तर आगरी समाजाची ६ ते ७ कुळ हे सोमवंशी बिंबराजा च्या सोबत कोकणात आले , त्यापुर्वी आगरी सैन्यात तैनात होऊन १३ शतकात कोकणात आले. आगरी समाजाचा वसाहती आवरे , पिरकोन, घारापुरी,उरण येथे होत्या. पुरी म्हणजे घारापुरी येथे त्यांची प्राचिन राजधानी होती, आजही घारापुरी येथे आगरी समाजाची वसाहत आहे तसेच उरण तालुक्यातील सारडे गावात आजही आगरी समाजातील भोईर, माळी कुटुंबिय राहतात, यांना माहिकावतीच्या बखरीत सोमवंशी क्षत्रिय तसेच महाराष्ट्रिक म्हटलं गेलं आहेत मुंबई शहरात परळ ईथे जन्मलेले कु.धिरज प्रभाकर भोईर हे या क्षत्रिय समाजाचे सध्याचे वंशज आहेत.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/27/Mumbadevi_temple.jpg/320px-Mumbadevi_temple.jpg)
महिकावतीच्या (माहिमच्या) बखरीत भोईर कुळाचा उल्लेख आला आहे, त्यांना बिंबराजांप्रमाणे महाराष्ट्रिक म्हंटले गेले आहे, तो ह्या प्रमाणे आहे, "विक्रम सवंत् ११३५ बिंबदेवा सवें कुळे सोमवंस २७||" त्यामध्ये मुखें इतर जात म्हणजेच सोमवंशी क्षत्रियांची मुख्य शाखा व इतर शाखा त्यामधील इतर शाखा म्हणजेच बारा खुमें ज्ञात, त्यांत कवळी , दरणे, भोईर, पड्या, माळी, घरठी, भटयारी, सांखळे, उभार, नाईते, गाण, विर ही कुळे असुन यांस गोत्रे देवनाम. तसेच ह्या कुळांपैकी कवळी, भोईर आणि माळी ह्या कुळांतील सोमवंशी क्षत्रियांचे राज्य यवनी आक्रमकांनी बुडविल्यामुळे ह्या क्षत्रियांनी शस्त्र सोडुन वाडीमे केचा उदिम धरिला , पुढे हेच बारा खुमें ज्ञातीतील सोमवंशी क्षत्रिय त्यांच्या मिठ ,शेती ,वाडी मळे पिकवण्याच्या धंद्यामुळे आगरी,कुणबी म्हणुन ओळखले जाऊ लागले व पुढे कोळी ज्ञातीशी बंधुभावाचे सबंध येऊन खाडीमध्ये मासेमारी करु लागले, हे शिलाहार साम्राज्याच्या काळाच्या पुर्वीपासून उत्तर कोकणात कुलाबा जिल्ह्यातील अंबा नदीच्या उत्तरेला आणि पाताळगंगा नदीच्या दक्षिणेस राहत अशी नोंद आहे,ज्यांच्या साम्राज्यावरचा सुर्य कधीच मावळत नाही असा ज्यांचा समज होता, अर्ध्या जगावर राज्य करणारे हे साम्राज्यवादी ब्रिटिश राजवटीत ते उरण तालुक्यातील वस्तीला आले ते सधन श्रीमंत असल्याने त्यांनी ते जमिनी क्रय केल्या, कुळ कायद्यात यांना जमिनी मिळाल्या नाहीत त्यापुर्वी ૧૭૩૦च्या सुमारास जेव्हा उरण करंजा बेटावर वर फिरंग्याचे म्हणजे पोर्तुगीजांचे राज्य होते, तेंव्हा मानाजी आंगरे यांनी ते अवघ्या ૨૦૦૦ सैन्य घेऊन जिंकले तेंव्हा कुणीतरी मुंबईत असलेल्या पंधरा हजार उभे सैन्य असणारे टोपीकरांना म्हणजे ब्रिटिशांना उरण करंजा मोरा जिंकण्यासाठी सांगितले तेव्हा सातशे ते आठशे आगरी लोक आंगर्याना मिळालेली आहेत असे एक कारण देऊन मुंबईवरून उरण जिंकायला नकार दिला ,ईथे मानाजी आंग्रे आणि तत्कालीन उरणच्या आगरी लोकांचे सामर्थ्य कळतं . ( संदर्भ:- The Rise of Bombay a retrospect )
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/b9/Shree_Siddhivinayak_Temple_Mumbai.jpg/640px-Shree_Siddhivinayak_Temple_Mumbai.jpg)
श्री सिद्धिविनायक मंदिर हे भगवान श्री गणेशाला समर्पित हिंदू मंदिर आहे. हे प्रभादेवी, मुंबई येथे आहे. हे मूळतः मुंबई शहरातील सोमवंशी क्षत्रिय ययाती राजाच्या क्षत्रियकुळातील म्हणजेच सध्याच्या आगरी समाजातील लक्ष्मण विठू आणि देउबाई पाटील यांनी 19 नोव्हेंबर 1801 रोजी बांधले होते. हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. मुंबई येथील परळ रेल्वे स्थानकाच्या वायव्य दिशेला आगरी समाजाच्या नारळी पोफळीच्या बागा होत्या त्याकाळी दादरच्या गोखले रोड पर्यंत समुद्र होता.
तर जे आगरी चितोडगडावरून महाराष्ट्रात, दिल्लीत, गुजरातमध्ये आले आहेत ते शिसोदिया राजपूत असुन श्रीरामाचे वंशज आहेत त्यांना सुर्यवंशी मराठा असं संबोधतात. (https://archive.org/stream/in.ernet.dli.2015.101309/2015.101309.Agris-A-Socio-economic-Survey_djvu.txt)