क्रिकेट विश्वचषक, २०१९
From Wikipedia, the free encyclopedia
२०१९ क्रिकेट विश्वचषक (अधिकृतपणे आय.सी.सी क्रिकेट विश्वचषक २०१९) ही जागतिक क्रिकेट स्पर्धा क्रिकेट विश्वचषकातील १२वी स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये ३० मे ते १४ जुलै २०१९ दरम्यान खेळण्यात आली.[1][2] यात यजमान देश इंग्लंड विजेता झाला. या स्पर्धेचा पहिला सामना द ओव्हलवर तर अंतिम सामना ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर झाला. यात इंग्लंडने न्यू झीलंडशी समसमान धावा केल्याने अधिक चौकर मारल्याच्या जोरावर विजेतेपद मिळविले.
आयसीसी क्रिकेट विश्वचषक, २०१९ | |||
---|---|---|---|
चित्र:ICC WC 2019 logo.webp २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक अधिकृत प्रतिक चिन्ह | |||
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती | ||
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने | ||
स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि बाद फेरी | ||
यजमान | वेल्स | ||
विजेते | इंग्लंड (1 वेळा) | ||
सहभाग | १० | ||
सामने | ४८ | ||
सर्वात जास्त धावा | रोहित शर्मा (६४८) | ||
सर्वात जास्त बळी | मिचेल स्टार्क (२७) | ||
दिनांक | ३० मे – १५ जुलै | ||
|
याआधी इंग्लंड आणि वेल्सकडे १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ मध्ये या स्पर्धेचे यजमानपद होते. विश्वचषकाच्या तोपर्यंतच्या ३९ वर्षांच्या इतिहासात यजमान देश विजयी होण्याचा हा दुसराच प्रसंग आहे.
विश्वचषक स्पर्धेच्या या आवृत्तीमध्ये स्पर्धेच्या स्वरूपात बदल करण्यात आले. २०११ आणि २०१५ मधील विश्वचषक स्पर्धांमध्ये १४ संघ पात्र ठरले होते, ज्यांमध्ये घट होऊन २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये दहाच संघांना स्थान होते. यजमान, इंग्लंड आणि ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत आयसीसी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय रॅंकिंगमधील अन्य पहिले सात संघ हे आपोआप पात्र ठरले, तर उर्वरित दोन स्थानांसाठी २०१८ क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेतील दोन अव्वल संघ पात्र झाले. सर्व दहा संघ एकाच गटात असून प्रत्येक संघ दुसऱ्या संघाशी एक सामना खेळेल. गुणफलकातील अव्वल ४ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. या स्वरूपाला व विशेषतः दहाच देशांचा विश्वचषकाला जगभरातून खासकरून असोसिएट देशांकडून विरोध झाला कारण असोसिएट सदस्य देश या मोठी संधी देण्याऱ्या स्पर्धेस मुकले. पात्रतेचे निकष घोषित करताना आयसीसी असोसिएट आणि संलग्न सदस्य, ज्यांना मागील दोन विश्वचषक स्पर्धांमध्ये चार स्थानांची हमी देण्यात आली होती, त्यापैकी जास्तीत जास्त दोन संघ जर त्यांच्यापेक्षा खालील क्रमांकांच्या संघांकडून पराभूत न झाल्यास पात्र होऊ शकतात. यानुसार कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या १० देशांपैकी किमान दोन संघांना पात्रता स्पर्धेला तोंड द्यावे लागले, आणि विश्वचषक स्पर्धेला मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली.
स्पर्धेच्या स्वरूपात बदल करण्यात आले. सर्व १० संघ एकाच गटात राहतील व प्रत्येक संघ दुसऱ्या संघाशी एक सामना खेळेल, गुणफलकातील अव्वल ४ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. १० देशांचा विश्वचषकाला जगभरातून खासकरून असोसिएट देशांकडून विरोध झाला कारण असोसिएट सदस्य देश मोठ्या आणि संधी देण्याऱ्या स्पर्धेस मुकले. साल २०१७ मध्ये आय.सी.सी ने पूर्ण सदस्यांची संख्या आयर्लंड आणि अफगाणिस्तान यांना कसोटी देश घोषित करून १० वरून १२ केली, त्यामुळे सगळे पूर्ण सदस्य खेळत नसलेला हा पहिलाच विश्वचषक असणार आहे.[3] तर पात्रतेतून एकही असोसिएट देश पात्र न ठरल्याने एकही असोसिएट देश खेळत नसलेला हा पहिलाच विश्वचषक आहे.
फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे भारतीय सैन्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक भारतीय खेळाडू आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट फेरीतील सामन्यावर बहिष्कार घालून, पाक संघाला स्पर्धेत खेळण्यास बंदी घालण्याची विनंती केली.[4][5][6] परंतु दुबई येथील पत्रकार परिषदेत वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानवर बंदी घालण्याच्या बीसीसीआयच्या निवेदनास नकार दिला आणि दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या वादानंतरही, निर्धारित सामना नियोजित वेळेवरच खेळवला जाईल असे आश्वासन दिले.[7][8]