भारतीय भारोत्तोलक From Wikipedia, the free encyclopedia
साइखोम मीराबाई चानू (८ ऑगस्ट, १९९४ - ) ही एक भारतीय भारोत्तोलक (वेट लिफ्टर) आहे. तिने २०२० तोक्यो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ४९ किलो गटात रौप्य पदक जिंकले.[1][2][3] मीराबाई चानूने कॉमनवेल्थ गेम्समध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि अनेक पदके जिंकली आहेत.
खेळातील योगदानाबद्दल तिला भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.[4] तसेच २०१८ मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न देऊन तिला सन्मानित केले.[5]
चानूने २०१४ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, ग्लासगो येथे महिलांच्या ४८ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले; गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धेच्या २०१८ च्या आवृत्तीत सुवर्णपदकाच्या मार्गावर तिने विक्रम मोडला. २०२० उन्हाळी ऑलिंपिकपूर्वी, २०१७ मध्ये तिची सर्वात मोठी कामगिरी झाली- तिने अनाहिम, कॅलिफोर्निया येथे झालेल्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले.[6]
साईखोम मीराबाई चानूचा जन्म ८ ऑगस्ट १९९४ रोजी नॉन्गपोक काकचिंग या मणिपूरच्याइम्फाळ शहरापासून सुमारे ३० किमी अंतरावर मेईतेई कुटुंबात झाला. ती फक्त १२ वर्षांची असताना तिच्या कुटुंबाने तिची ताकद ओळखली. ती जळाऊ लाकडाचा मोठा बंडल सहज घरी घेऊन जायची, जो मोठ्या भावाला उचलणे देखील कठीण वाटायचे.[7]
मीराबाईने मणिपूर येथील स्पोर्ट्स अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले. तिने वाळू वाहून नेणाऱ्या ट्रक चालकांसोबत प्रवास केला. ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर तिने ट्रक चालकांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले आणि आदराचे प्रतीक म्हणून त्यांच्या पायांना स्पर्श केला.[8]