लाल बहादूर शास्त्री
भारताचे पंतप्रधान / From Wikipedia, the free encyclopedia
लाल बहादूर शास्त्री (रोमन लिपी: Lal Bahadur Shastri) (२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ - ११ जानेवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हिएत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हिएत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी, इ.स. १९६६ रोजी विषप्रयोग झाल्यामुळे मृत्यू झाला. [ संदर्भ हवा ]
जलद तथ्य मागील, पुढील ...
लाल बहादूर शास्त्री | |
दुसरे भारतीय पंतप्रधान | |
कार्यकाळ जून ९, इ.स. १९६४ – जानेवारी १२ इ.स. १९६६ | |
मागील | गुलजारी लाल नंदा |
---|---|
पुढील | गुलजारी लाल नंदा |
तिसरे भारतीय परराष्ट्रमंत्री | |
कार्यकाळ जून ९, इ.स. १९६४ – जुलै १७, इ.स. १९६४ | |
मागील | गुलजारी लाल नंदा |
पुढील | सरदार स्वर्णसिंग |
जन्म | ऑक्टोबर २, इ.स. १९०४ मुगलसराई, भारत |
मृत्यू | जानेवारी ११, इ.स. १९६६ ताश्कंद |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पत्नी | ललिता देवी |
धर्म | हिंदू |
बंद करा