राजन गवस
अत्याळ / From Wikipedia, the free encyclopedia
डॉ. राजन गणपती गवस यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ या गावी २१ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. गवस हे मराठीतील नामवंत लेखक आहेत. त्यांच्या 'तणकट' या कादंबरीला २००१ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.[1]
जलद तथ्य राजन गवस, जन्म नाव ...
राजन गवस | |
---|---|
जन्म नाव | राजन गणपती गवस |
जन्म |
नोव्हेंबर २१, इ.स. १९५९ अत्याळ, ता. गडहिग्लज कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | प्रोफेसर |
साहित्य प्रकार | कविता, कथा, कादंबरी, समीक्षा, ललितगद्य |
विषय | सामाजिक, राजकीय, वैचारिक, सांस्कृतिक |
चळवळ | देवदासी चळवळ |
प्रसिद्ध साहित्यकृती |
चौंडकं भंडारभोग धिंगाणा तणकट ब- बळीचा |
पत्नी | अलका |
अपत्ये | संहिता, सहर्ष |
पुरस्कार |
|
बंद करा
राजन गवस यांचे रविवारच्या 'सकाळ'च्या 'सप्तरंग' पुरवणीतले शब्दांची कुळकथा हे साप्ताहिक सदर वाचक आवर्जून वाचत. राजन गवस यांची 'चौंडकं' ही कादंबरी खूप गाजली. ते मुक्त लेखक आहेत. 'लोकसत्ता'च्या शनिवारच्या 'चतुरंग' या पुरवणीत 'सुत्तडगुत्तड' या सदरात ते लेखन करीत असत.