![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/5c/Neerja_marathi_writer.jpg/640px-Neerja_marathi_writer.jpg&w=640&q=50)
नीरजा (कवयित्री)
एक मराठी कवयित्री व कथालेखिका / From Wikipedia, the free encyclopedia
नीरजा या एक मराठीतील कवयित्री व कथालेखिका आहेत. त्या समीक्षक म.सु. पाटील यांच्या कन्या आहेत.त्यांच्या आईचे नाव विभावरी पाटील आहे, 'ग्रंथाली' आणि 'सानेगुरुजी ट्रस्ट'च्या अनुवाद सुविधा केंदाच्या त्या पदाधिकारी आहेत.
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
नीरजा यांच्या कवितालेखनाला महाविद्यालयीन काळातच सुरुवात झाली असली, तरी त्यांच्या कवितेला पहिली महत्त्वाची दाद मिळाली ती, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर. विश्राम बेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत राजा शिवाजी विद्यालयात ६०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते, तेव्हा नीरजा यांनी या संमेलनात पहिल्यांदा नवोदित कवींच्या व्यासपीठावर 'सावित्री' ही कविता वाचली होती. या कवितेला तेव्हा एवढी दाद मिळाली की पुढच्याच वर्षी त्यांचा समावेश निमंत्रितांच्या कविसंमेलनात झाला. त्यानंतर ’वेणा’ हा नीरजा यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला.
नीरजा यांचे "सकाळ सप्तरंग‘मधील "मी कात टाकली‘ हे सदर लोकप्रिय झाले आहे. आधुनिक जीवनजाणिवा त्यांच्या एकूणच लेखनातून व्यक्त होताना दिसतात. .