From Wikipedia, the free encyclopedia
नलिनी जयवंत (१८ फेब्रुवारी, १९२६:मुंबई, महाराष्ट्र, भारत - २२ डिसेंबर, २०१०:चेंबूर, मुंबई) या एक भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या. बॉलीवूडच्या कृष्ण-धवल काळातील १९४० आणि १९५० च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटांत प्रामुख्याने काम केले.[1]
नलिनी जयवंत | |
---|---|
नलिनी जयवंत | |
जन्म |
१८ फेब्रुवारी १९२६ बॉम्बे, बॉम्बे प्रेसिडेन्सी, ब्रिटिश इंडिया |
मृत्यू |
२२ डिसेंबर, २०१० (वय ८४) मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेत्री |
कारकीर्दीचा काळ | १९४१ ते १९६५, १९८३ |
भाषा | हिंदी |
पती | , |
नलिनी जयवंत यांचा जन्म १९२६ मध्ये मुंबई येथे झाला. मराठी/हिंदी चित्रपट अभिनेत्री रतन बाई या नलिनीच्या आत्या होत्या. रतन बाईची मुलगी अभिनेत्री शोभना समर्थ असून, शोभनाच्या मुली नूतन आणि तनुजा या आहेत.[2] इ.स. १९८३ मध्ये त्यांनी नास्तिक या हिंदी चित्रपटात शेवटचे काम केले होते. तेव्हा पासून नलिनी मुख्यतः एकाकी जीवन जगत होत्या.[3][4]
जयवंत यांचा विवाह १९४५ मध्ये दिग्दर्शक वीरेंद्र देसाई यांच्याशी झाला होता. इ.स. १९४८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी १९६० मध्ये अभिनेते प्रभु दयाल यांच्याशी लग्न केले. या जोडप्याने त्याकाळी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले होते.[5]
जयवंत यांचे २२ डिसेंबर, २०१० रोजी, वयाच्या ८४ व्या वर्षी, युनियन पार्क, चेंबूर, मुंबई येथे त्यांच्या ६० वर्षांच्या बंगल्यावर निधन झाले . तिच्या मृत्यूच्या तीन दिवसांनंतर रुग्णवाहिकेने तिचा मृतदेह घेऊन जाईपर्यंत तिचा मृत्यू कोणाच्याही लक्षात आला नाही. जयवंतच्या शेजाऱ्यांनी सांगितले की तिने स्वतःला समाजापासून वेगळे केले आहे आणि २००१ मध्ये दयालच्या मृत्यूनंतर ती लोकांना भेटत नव्हती. तिचे नातेवाईक देखील तिच्याशी बराच काळ संपर्कात नव्हते.[6]
तो काळ हिंदी चित्रपट सृष्टीतील सुमधुर गाण्यांचा असल्याने नलिनी जयवंत वर चित्रित केलेली काही प्रसिद्ध गाणी पुढील प्रमाणे आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.