द ग्रेटेस्ट इंडियन
आधुनिक भारतातील सर्वश्रेष्ठ व्यक्तीची जनतेद्वारे निवड करणारे सर्वक्षण / From Wikipedia, the free encyclopedia
द ग्रेटेस्ट इंडियन (मराठी : सर्वात महान भारतीय किंवा सर्वश्रेष्ठ भारतीय) हे सीएनएन आयबीएन आणि हिस्ट्री टिव्ही१८ या दूरचित्रवाहिन्यांसोबत आऊटलुक मॅगझीन व रिलायन्स मोबाईलद्वारे आयोजित केले गेलेले सन २०१२ चेएक सर्वेक्षण होते. भारतीय जनतेच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा भारतीय स्वातंत्र्यानंतरचा (१९४७) आणि महात्मा गांधी यांच्यानंतरचा ‘सर्वात महान भारतीय कोण’? या संकल्पनेवर जून इ.स. २०१२ ते ऑगस्ट इ.स. २०१२ दरम्यान हे सर्वेक्षण आयोजित करण्यात आले होते.[1] ११ ऑगस्ट २०१२ रोजी या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'द ग्रेटेस्ट इंडियन' म्हणून घोषित केले गेले.[2][3][4][5][6]