काळू नदी
From Wikipedia, the free encyclopedia
काळू ही महाराष्ट्रातील ठाणे व पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे. हिचा उगम ठाणे , पुणे व नगर जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या कळसुबाई- हरिश्चंद वन्यजीव अभयारण्यात पुणे जिल्ह्यातील पिंपळगाव जोगा धरणाजवळ खिरेश्वर येथे हरिश्चंद्र शिखराच्या दक्षिण उतरा दरम्यान टोलार खिंडीमध्ये होतो. ह्या नदीने प्रवरा नदीची उपनदी असणाऱ्या व मध्य अहमदनगर जिल्ह्याची भाग्यरेखा असणाऱ्या मुळा नदीच्या [1]शीर्ष प्रवाहांचे अपहरण केलं आहे, असे अनेक तज्ञांचे दृढ मत आहे, त्यामुळे सह्याद्रीत घाट-माथ्यावर पडणाऱ्या जोरदार पावसाचे पाणी दुष्काळ ग्रस्त अहमदनगर जिल्ह्याला व मराठवाड्याला न मिळता खाली कोकणात वाहून जाते. कोकणात भरपूर, मुबलक पाणी असून. देखील, हे सर्व पाणी समुद्रातच वाहून जाते. काळू नदीच्या दोन प्रमुख उपनद्या आहेत. भातसा व डोईफोडी ,पैकी सरळगाव संगम येथे डोईफोडी काळूस येऊन मिळते तर टिटवाळा आणि आंबिवलीच्या दरम्यान भातसा नदी येऊन मिळते ,येथूनच पूढे चार-पाच किलोमीटर अंतरावर अटाळी या गावी काळू व भातसेचा संयुक्त प्रवाह उल्हास नदीस मिळतो . पुढे उल्हासनदी कल्याण ,ठाणे मार्गे अरबी समुद्रात वसइच्या खाडीत जाऊन मिळते .नदीवरील सावर्ने -माळशेजघाट येथिल काळू वॉटर फॉल धबधबा प्रचंड प्रसिद्ध आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |