केदार जाधव
भारताचा क्रिकेट खेळाडू. From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Remove ads
क्रिकेट विक्रम
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
महाराष्ट्र क्रिकेट संघातील खेळाडूंमध्ये भारतीय संघात स्थान मिळविण्याची क्षमता नाही, अशी नेहमीच टीका केली जात असते. मात्र महाराष्ट्राच्या हृषीकेश कानिटकर याने १९८८ मध्ये ढाका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर चौकार मारून भारतास विजेतेपद मिळवून दिले होते. त्याची ही कामगिरी टीकाकारांकडून नेहमीच विसरली जाते. केदार जाधव याच्याबाबत असेच दिसून आले. ज्या वेळी इंग्लंडविरुद्ध रविवारी पुण्यात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात केदारला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले त्या वेळी अनेक क्रिकेटपंडितांनी भुवया उंचावल्या होत्या. त्याच्यापेक्षा अमित मिश्रा किंवा अजिंक्य रहाणे याला संधी द्यायला पाहिजे होती, अशी टिप्पणी लगेचच समाजमाध्यमांवर उमटली होती. मात्र केदारने अद्वितीय शतकी खेळी करत आपल्या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.
Remove ads
बाह्य दुवे
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads