२०२२ मधील महाराष्ट्रातील राजकीय पेच
From Wikipedia, the free encyclopedia
२०२२ मधील महाराष्ट्रातील राजकीय पेच हा २१ जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीच्या अनेक आमदारांसह भारतीय जनता पक्ष शासित गुजरातमधील सुरतला गेल्यावर सुरू झाला. यामुळे आघाडी सरकार संकटात आले. [2] [3] [4] नंतर हा गट दुसऱ्या भाजपशासित राज्यात, आसाममध्ये गुवाहाटी येथे गेला. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर शिवसेनेतील बंडखोरी आणि आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला, ज्याचा नंतर भाजपच्या सुशील मोदी यांनी केलेल्या टिप्पणीत स्पष्टपणे उल्लेख केला. [5] [6]
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
Part of महाराष्ट्राचे राजकारण | ||||||
| ||||||
तारीख | जून २१–३०, २०२२ (२०२२-०६-२१ – २०२२-०६-३०) (9 days) | |||||
---|---|---|---|---|---|---|
स्थान |
मुंबई, महाराष्ट्र गुवाहाटी, आसाम सुरत, गुजरात पणजी, गोवा | |||||
प्रकार | संसदीय राजकारण वाद | |||||
Cause | एकनाथ शिंदे यांचे अनेक आमदारांना घेऊन सुरतला आणि नंतर गुवाहाटीला जाणे | |||||
हेतू | महाविकास आघाडी तोडणे आणि भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीची पुनर्निर्मिती करणे | |||||
Target | महाविकास आघाडी | |||||
सहभागी |
महाविकास आघाडी आणि अपक्ष आमदार | |||||
Outcome |
|
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारले कारण ते निवडून आलेल्या शिवसेनेच्या दोन तृतीयांश सदस्यांच्या विनंतीनंतरही महाविकास आघाडी न सोडण्याच्या ठाकरेंच्या निर्णयाशी असहमत होते. शिंदे यांच्या गटाला अखेर पक्षावर ताबा मिळवण्यात आणि भाजपच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्यात यश आले. [7] २९ जून २०२२ रोजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, यांनी २९ जूनला होणाऱ्या अविश्वास प्रस्तावापूर्वी समाजमाध्यमावर थेट बोलताना पदाचा तसेच विधीमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला. [8] ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे अविश्वास प्रस्ताव रद्द झाला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून रोजी उपमुख्यमंत्री म्हणून सरकारचा वाटा उचलला.