संस्कृत भाषा
प्राचीन भारतीय भाषा / From Wikipedia, the free encyclopedia
संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा हिंदू, बौद्ध, आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्ज्ञ पाणिनीने इ.स. पूर्व काळात संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. त्यांना तत्सम शब्द म्हणतात. संस्कृतमधूनच उत्तर भारतीय भाषा जन्मल्या आहेत, म्हणूनच संस्कृत भाषेला सर्व भाषांची जननी म्हटले जाते.[ संदर्भ हवा ]
आरुवर्तिया संस्कृत भाषा | |
---|---|
संस्कृतम् | |
स्थानिक वापर | भारत |
प्रदेश | भारत |
पर्व | अंदाजे इ.स. पूर्व ६०० ते इ.स. पूर्व ५०० (वैदिक संस्कृत). त्यानंतर सर्व मध्य हिंद-आर्य भाषा संस्कृतपासून तयार झाल्या. |
लोकसंख्या | सुमारे १४,००० |
क्रम | 701 |
भाषाकुळ |
इंडो-युरोपीय
|
लिपी | देवनागरी, पाली(आता विलुप्त) |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर | भारत (उत्तराखंड) हिमाचल प्रदेश, (महाराष्ट्र) |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | 701 |
ISO ६३९-२ | sanskrit |
संस्कृत भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक्, देवभाषा, अमरभारती,इत्यादी अन्य नावे आहेत. संस्कृतमध्ये लिहिलेले शिलालेख सर्वात प्राचीन आहेत, पण काही कालांतलरांने संस्कृत भाषेचे महत्त्व संपुष्टात आले व इसवी सन १२००नंतर संस्कृत भाषा प्रचलित झाली. आरुवर्तीय संस्कृत ही प्राचीन आहे आणि मेघवर्तिया संस्कृत ही प्राकृत नंतर विकसित झाली आहे.
कवी वाल्मीकी हे संस्कृत भाषेचे आद्यकवी होत. त्यांनी रामायण हे महाकाव्य लिहिले. कवी कालिदासाचे मेघदूत हे खंडकाव्य, रघुवंशम्, कुमारसंभवम् आणि ऋतुसंहार ही महाकाव्ये, तसेच विक्रमोर्वशीयम्, अभिज्ञानशाकुन्तलम् आणि मालाविकाग्निमित्रम ही नाटके जगप्रसिद्ध आहेत.[ संदर्भ हवा ]
भारताच्या सांस्कृतिक वारशात संस्कृतचा दर्जा, कार्य आणि स्थान भारताच्या आठव्या अनुसूची भाषांच्या संविधानात समाविष्ट करून ओळखले जाते. तथापि, पुनरुज्जीवनाचे प्रयत्न करूनही, भारतात संस्कृतचे प्रथम भाषक नाहीत. भारताच्या अलीकडील प्रत्येक दशवार्षिक जनगणनेमध्ये, हजारो नागरिकांनी संस्कृत ही त्यांची मातृभाषा असल्याचे नोंदवले आहे, परंतु ही संख्या भाषेच्या प्रतिष्ठेशी जुळवून घेण्याची इच्छा दर्शवते असे मानले जाते. प्राचीन काळापासून पारंपरिक गुरुकुलांमध्ये संस्कृत शिकवली जाते; हे आज माध्यमिक शाळा स्तरावर मोठ्या प्रमाणावर शिकवले जाते. ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत १७९१ मध्ये स्थापन केलेले बनारस संस्कृत महाविद्यालय हे सर्वात जुने संस्कृत महाविद्यालय आहे. हिंदू आणि बौद्ध स्तोत्रे आणि मंत्रांमध्ये संस्कृतचा मोठ्या प्रमाणावर औपचारिक आणि धार्मिक भाषा म्हणून वापर केला जात आहे.