मुरारबाजी देशपांडे
मराठा साम्राज्याचा भारतीय सेनापती / From Wikipedia, the free encyclopedia
मुरारबाजी देशपांडे (जन्मदिनांक अज्ञात - - १६ मे, १६६५)[1][2] हे मराठा सैन्यातील वीर होते. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव. इ.स. १६६५ साली मोगलांनी पुरंदर किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात त्यांनी मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. मात्र १६ मे, १६६५ रोजी मोगलांनी केलेल्या सुलतानढव्याचा प्रतिकार करताना त्यांना वीरमरण आले.