पी.व्ही. सिंधू
भारतीय बॅडमिंटनपटू / From Wikipedia, the free encyclopedia
पुसारला वेंकट सिंधू (जन्म ५ जुलै १९९५) ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. ती भारतातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानली जाते. सिंधूने ऑलिम्पिक आणि बी.डब्लू.एफ. सर्किट स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत.[2] यामध्ये जागतिक चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदकाचाही समावेश आहे. बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन बनणारी ती पहिली आणि एकमेव भारतीय आहे.[3] तसेच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सलग दोन पदके जिंकणारी भारतातील दुसरी वैयक्तिक ऍथलीट आहे.[4][5] २ एप्रिल २०१७ मध्ये तिने तिच्या कारकिर्दीतील उच्च असलेला जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावला.[6][7]
पी.व्ही. सिंधू (२०१६) | |
वैयक्तिक माहिती | |
---|---|
जन्म नाव | पुसारला वेंकटा सिंधू |
जन्म दिनांक | ५ जुलै, १९९५ (1995-07-05) (वय: २९) |
जन्म स्थळ | हैदराबाद, भारत[1] |
उंची | १.७९ मी (५ फूट १० इंच) |
वजन | ६५ किलो (१४० पौंड) |
देश | भारत |
कार्यकाळ | २००८ पासून |
हात | उजवा |
प्रशिक्षक | पुल्लेला गोपीचंद |
महिला एकेरी | |
सर्वोत्तम मानांकन | 2 (2017) |
सद्य मानांकन | 4 (17 march 2018) |
स्पर्धा | १८९ विजय, ८७ पराजय |
बी ड्ब्लु एफ |
सिंधूने सप्टेंबर २०१२ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी बी.डब्लू.एफ. जागतिक क्रमवारीत अव्वल २० मध्ये स्थान मिळविले.[8] तिने बी.डब्लू.एफ. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एकूण पाच पदके जिंकली आहेत आणि या स्पर्धेत पाच किंवा त्याहून अधिक एकेरी पदके जिंकणारी चीनच्या झांग निंग नंतरची ती दुसरी महिला आहे.
तिने २०१६ उन्हाळी रिओ ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. येथे अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरली. या स्पर्धेत तिने स्पेनच्या कॅरोलिना मारिनला हरवून रौप्य पदक जिंकले.[9] २०२० च्या तोक्यो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला. तसेच कांस्य पदक जिंकले. दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.[10]
सिंधूने २०१६ चायना ओपन स्पर्धांमध्ये तिची पहिली सुपरसीरिज जिंकली आणि त्यानंतर २०१७ मध्ये दक्षिण कोरिया आणि भारतात आणखी चार अंतिम सामने जिंकून विजेतेपद पटकावले. त्या व्यतिरिक्त तिने २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धा आणि २०१८ आशियाई स्पर्धांमध्ये एक-एक रौप्य पदक मिळवले. तसेच यानंतर उबेर कपमध्येदेखील तिने दोन कांस्य पदके जिंकली.
सिंधूने $8.5 दशलक्ष, $5.5 दशलक्ष आणि $7.2 दशलक्ष कमाईसह अनुक्रमे २०१८, २०१९ आणि २०२१ मध्ये फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले.[11][12]
भारत सरकारने अर्जुन पुरस्कार तसेच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे प्रतिष्ठित क्रीडा पुरस्कार देऊन तिचा गौरव केला. तसेच ती भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्मश्रीची प्राप्तकर्ता आहे. तिला जानेवारी २०२० मध्ये पद्मभूषण हा भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.[13][14][15]