विनायक दामोदर सावरकर
भारतीय क्रांतिकारक, राजकारणी, वकील, कवी,लेखक, नाटककार, समाजसुधारक / From Wikipedia, the free encyclopedia
स्वातन्त्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (जन्म : भगूर-नाशिक, २८ मे १८८३; - मुंबई, २६ फेब्रुवारी १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते.[3] १९३८ च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 'हिंदुत्व' या संकल्पनेचे प्रणेते असून सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे होते. सावरकरांच्या मतानुसार हिंदुत्वाची व्याख्या पुढीलप्रमाणे :- आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका । पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥ [4][5]
जलद तथ्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, जन्म: ...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर | |
---|---|
सावरकरांचे छायाचित्र | |
जन्म: | २८ मे १८८३ भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत |
मृत्यू: | २६ फेब्रुवारी १९६६ दादर, मुंबई, महाराष्ट्र, भारत |
चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा |
संघटना: | अभिनव भारत अखिल भारतीय हिंदू महासभा |
प्रमुख स्मारके: | मुंबई, पुणे, बिहार, दिल्ली, अंदमान, नाशिक |
धर्म: | हिंदू ( चित्पावन ब्राह्मण ) |
प्रभाव: | छत्रपती शिवाजी महाराज[ संदर्भ हवा ], जोसेफ मॅझिनी, चापेकर बंधू |
प्रभावित: | अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, शरद पोंक्षे, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, अनंत ओगले, शेषराव मोरे |
वडील: | दामोदर विनायक सावरकर |
आई: | राधाबाई दामोदर सावरकर [1] |
पत्नी: | यमुनाबाई विनायक सावरकर (माई)[2] |
अपत्ये: | प्रभाकर, प्रभा, शालिनी, विश्वास |
बंद करा