गोपाळ गणेश आगरकर
महाराष्ट्रातील पत्रकार व समाजसुधारक / From Wikipedia, the free encyclopedia
गोपाळ गणेश आगरकर (जन्म : टेंभू-सातारा, १४ जुलै १८५६; - १७ जून १८९५) हे महाराष्ट्रातील विचारवंत, समाजसुधारक, पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ होते. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी व मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान-निष्ठा ही त्यांची जीवनमूल्ये होती. मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे असा लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लिहिला.
जलद तथ्य गोपाळ गणेश आगरकर, जन्म: ...
गोपाळ गणेश आगरकर | |
---|---|
जन्म: | १४ जुलै १८५६ टेंभू, तालुका: कराड, जिल्हा: सातारा |
मृत्यू: | १७ जून १८९५ पुणे, महाराष्ट्र |
चळवळ: | समाजसुधारणा |
पत्रकारिता/ लेखन: | केसरी सुधारक |
धर्म: | हिंदू |
वडील: | गणेश आगरकर |
पत्नी: | यशोदाबाई आगरकर |
अपत्ये: | यशवंत, माधव, व २ मुली |
बंद करा
बुद्धिप्रामाण्य वादाचे पुरस्कार करून महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा घडून आणणे या उद्देशाने समाजसुधारणा करणाऱ्या समाजसुधारकांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीतील क्रांतीकारी समाजसुधारक म्हणून आगरकर हे महत्त्वपूर्ण ठरतात.[1]