कृषि दिन (महाराष्ट्र)
कृषीप्रधान देशातला कृषी आणि कृषकांचा (शेतकऱ्यांचा) पावन पर्व / From Wikipedia, the free encyclopedia
कृषि दिन हा कृषीप्रधान देशाचा एक पावन पर्व मानला जातो. त्यामुळे कृषी दिनाला विशेष असे महत्त्व आहे. कृषी दिन १ जुलै रोजी हरितक्रांतीचेे जनक महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त शासन स्तरावर साजरा केला जातो. याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो. तसेच 'शेती आणि माती'वर निस्सीम भक्ती असणारे जागतिक ख्यातीचे कृषीतज्ञ व प्रगतशील शेतकरी महानायक वसंतराव नाईक यांना आदरांजली अर्पण केल्या जाते. महानायक वसंतराव नाईक यांचे लोकशाही सक्षमीकरण , ग्रामीण विकास व विशेषतः कृषी औद्योगिक क्षेत्रातील क्रांतिकारी योगदानामुळे त्यांना 'महानायक' , 'शेतकऱ्यांचा जाणता राजा' म्हणूनही संबोधले जाते. भारताचे राष्ट्रपती , भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी यांनी "वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहे." या शब्दात नाईकांचे गौरव केले. तसेच 'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर' मोहिमेचे प्रवर्तक, विचारवंत एकनाथराव पवार यांनी "आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत" या शब्दात महानायक वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे. [1][2]