मलिक मोहम्मद जायसी
From Wikipedia, the free encyclopedia
मलिक मोहम्मद जायसी नावाच्या सूफी कवीने इसवी सनाच्या सोळाव्या शतकात पद्मावत नावाचे कथाकाव्य लिहिले. हे काव्य अवधी भाषेत होते. या काव्याची नायिका चित्तोडची राणी पद्मिनी होती.
या 'पद्मावत' नावाच्या कथेवरूनच अनेक लोककथा, नाटके, कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. संजय लीला भन्साळी यांनी या कथेवर 'पद्मावती' नावाचा हिंदी चित्रपट काढला. राजपुतांच्या प्रचंड विरोधानंतर या बोलपटाचे नाव कोर्टाच्या आदेशानुसार पद्मावत असे बदलण्यात आले.