बाबुराव बागुल
From Wikipedia, the free encyclopedia
बाबुराव बागुल (जुलै १७, १९३० - मार्च २६, २००८) हे आंबेडकरवादी साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी होते. विद्रोही आंबेडकरवादी कथांचे प्रमुख उद्गाते आणि प्रखर वास्तववादी कादंबरीकार तसेच शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील, फुटपाथवरील भणंग जनजीवनाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख होती. प्रभावी व विद्रोही भाषाशैली, जिवंत प्रसंगचित्रण, कारुण्य आणि क्रुरता रेखाटन हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते. दलित साहित्य मध्ये मोठे योगदान देणारे एक प्रतिभावंत लेखक साहित्यिक म्हणून बाबूराव बागूल यांना एक नवी ओळख मिळालेले आहेत त्यांनी लिहिलेल्या कथा व कादंबऱ्या या गावकुसाबाहेर राहणाऱ्या समाजाच्या सामाजिक जाणिवांचं व वेदनांचं वर्णन करणारे आहेत स्त्रीप्रधान कथालेखन हा देखील त्यांच्या लिखाणाचा महत्त्वाचा भाग राहिलेला आहे सूड कथेमध्ये बाबुराव बागुल यांनी वाडी वस्तीवरील स्त्रीच्या हृदयद्रावक व तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचं चित्रण केलेला आहे या कथेतील स्त्री पात्र हे समाजातील स्त्रियांच्या शोषित पीडित स्त्रीच्या सामाजिक स्थितीचं चित्रण करणार आहे
बाबुराव बागुल | |
---|---|
जन्म नाव | बाबुराव रामजी बागुल |
टोपणनाव | आबा |
जन्म |
जुलै १७, १९३० विहितगाव, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू |
मार्च २६, २००८ नाशिक, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
चळवळ | मराठी आंबेडकरवादी साहित्य |
प्रसिद्ध साहित्यकृती |
मी जात चोरली होती मरण स्वस्त होत आहे |
प्रभाव |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्ल मार्क्स अण्णा भाऊ साठे |
वडील | रामजी/रामचंद्र |