अंबिकाबाई भोसले
From Wikipedia, the free encyclopedia
महाराणी अंबिकाबाई या छत्रपती राजाराम महाराजांच्या चौथ्या पत्नी होत्या. त्यांना अहिल्याबाई असेही म्हणले जाते. त्या वैरागकर नाईक निंबाळकर घराण्यातल्या होत्या. त्या निपुत्रिक होत्या. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्या विशाळगडावर सती गेल्या. त्यांचे वय त्या वेळी अवघे २४ ते २५ वर्षींचे असावे. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर अतिशय दृढ निश्चयाने अंबिकाबाई राणीसाहेब सती गेल्या. आजही विशाळगडावर एका चौथऱ्यावर दगडात कोरलेली दोन पावले दिसतात. ती अंबिकाबाई ऊर्फ अहिल्याबाई यांच्या समाधीची आहेत.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.
|
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
विकिस्रोतावर काय चालेल ?
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
- ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.
- ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.
- ऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.
महाराणी अंबिकाबाई भोसले | ||
---|---|---|
महाराणी | ||
मराठा साम्राज्य | ||
अधिकारकाळ | १६८९ - १७०० | |
राजधानी | जिंजी | |
पूर्ण नाव | अंबिकाबाई राजारामराजे भोसले | |
पदव्या | महाराणी | |
मृत्यू | १७०० | |
विशाळगड, महाराष्ट्र | ||
पूर्वाधिकारी | महाराणी ताराबाई | |
उत्तराधिकारी | महाराणी सकवारबाई (द्वितीय) | |
पती | छत्रपती राजाराम महाराज | |
राजघराणे | भोसले | |
चलन | होन |
महाराणी ताराबाई आणि महाराणी राजसबाई छत्रपती राजाराम राजेंच्या दोन्ही पत्नी, छ. राजाराम महाराजांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्याजवळ नव्हत्या. त्या पन्हाळा किल्ल्यावर होत्या. चौथी पत्नी अंबिकाबाई राणीसाहेब विशाळगडावर होत्या. त्यांना छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा चार सहा घटका दिवस होता. तेव्हा अंबिकाबाई राणीसाहेबांनी सहगमनाचा संकल्प केला आणि त्यासाठी मलकापूरहून साहित्य आणावयास हवालदारास सांगितले. तो बुचकळ्यात पडला आणि म्हणाला, 'दिवस थोडा राहिला. मलकापुराहुन साहित्य येणे त्यास रात्र होईल. गलबलीचे दिवस किल्ल्याचे काम. येविशी आज्ञा?' तेव्हा अंबिकाराणी बोलली, स्वार पाठवून जलदीने साहित्य आणवावे. मी गेल्यावाचून सूर्य अस्तास जाणार नाही.' असे म्हणून सदरेची सावली पडली होती, त्या सावलीजवळ किचित् मातीचा ढीग करवून त्यावर पळसाचे पान रोवले व म्हणले की, 'यास ओलांडन सावली जाणार नाही." आणि असे सांगतात की, खरोखरच अंबिकाबाई राणीच सहगमन होईपर्यत सावली त्या पळसाच्या पानाला ओलांडून गेली नाही. छ. राजाराम राजेंचे पागोटे हृदयाशी धस्त अंबिकाबाई राणीसाहेब सती गेल्या.
छ. राजाराम महाराजांचे जीवन हे समर्पण होते. राणी अंबिकाबाईचे जीवन हे राजारामाच्या चरणी वाहिलेले फूल होते. त्यांची समाधी ही त्या पवित्र समर्पणाची साक्ष आहे.