राजू शेट्टी
भारतीय राजकारणी From Wikipedia, the free encyclopedia
राजू शेट्टी (१ जून इ.स. १९६७;शिरोळ, कोल्हापूर) हे स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक आणि १५ व्या लोकसभेचे खासदार आहेत.[१] [२] शेतकऱ्यांना सहकारी कारखान्यांनी ऊस आणि दूध यांसाठी चांगली किंमत द्यावी यासाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे. [३]
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
राजू शेट्टी | |
विद्यमान | |
पदग्रहण इ.स. २००९ | |
मतदारसंघ | हातकणंगले |
---|---|
जन्म | १ जून इ.स. १९६७ शिरोळ, कोल्हापूर |
राजकीय पक्ष | स्वाभिमानी पक्ष |
पत्नी | सौ. संगीता शेट्टी |
निवास | शिरोळ |
गुरुकुल | जे.जे. मगदूम पॉलिटेकनीक (यंत्र अभियांत्रिकी पदविका) |
व्यवसाय | शेतकरी |
संकेतस्थळ | http://www.swabhimani.com/ |
कारकीर्द
राजू शेट्टी सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात निवडून आले. नंतर शिरोळ मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येताना राजेंद्र पाटील आणि रजनी मगदूम यांचा पराभव केला होता. इ.स.२००९ च्या ऑक्टोबर महिन्यातील निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांना ९५ हजार ६० मतांनी पराभूत करून धक्का दिला.[१]
पुरस्कार
- लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०११ [४]
बाह्य दुवे
- स्वाभिमान पक्षाचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2010-03-14 at the Wayback Machine.
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.