हंबीरराव मोहिते
छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती / From Wikipedia, the free encyclopedia
औसाजी तथा हंबीरराव मोहिते (१६३०:तळबीड, महाराष्ट्र - १६८७:वाई, महाराष्ट्र) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. प्रतापराव गुजरांच्या मृत्यूनंतर सरसेनापतीपदी त्यांची नेमणूक इ.स. १६७४ साली झाली. [1]
![]() |
हा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.
|
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
विकिस्रोतावर काय चालेल ?
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
- ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.
- ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.
- ऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.
बहलोलखानाशी लढताना तत्कालीन सरसेनापती प्रतापराव गुजरांनी २४ फेब्रुवारी, १६७४ रोजी वीरमरण पत्करल्यनांतर हंसाजी मोहिते यांची नेमणूक हंबीरराव या खिताबानिशी झाली. नेसरीच्या लढाईनंतर हंबीररावांनी आदिलशाही सेनेवर जबरदस्त उलटहल्ला केला आणि शत्रूला विजापूरपर्यंत पिटाळून लावले.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोयराबाईंनी हंबीररावांना संभाजी महाराजांऐवजी स्वतःचे पुत्र राजाराम महाराजांना सिंहासनावर बसविण्याची सूचना केली परंतु हंबीररावांनी शिवाजी महाराजांनी केलेल्या वारसनाम्याचा आदर करीत स्वतःच्या बहिणीस डावलून संभाजीमहाराजांशी हातमिळवणी केली. यामुळे हे सत्तांतरण अधिक रक्तरंजित झाले नाही.
१६८७मध्ये झालेल्या वाईच्या लढाईत तोफेचा गोळा लागून हंबीरराव धारातीर्थी पडले. महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हंबीररावांच्या कन्या महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या. या नात्याने हंबीररवा शिवाजीमहाराजांचे व्याही होत.