लोकमान्य टिळक
भारतीय स्वातंत्र्यसेनानी / From Wikipedia, the free encyclopedia
बाळ गंगाधर टिळक (जन्मनाव: केशव गंगाधर टिळक; जुलै २३, १८५६ - ऑगस्ट १, १९२०)[1][2] हे एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. ते लाल-बाल-पाल या त्रिकुटापैकी एक होते.[3]
बाळ गंगाधर टिळक | |
---|---|
लोकमान्य टिळकांचे प्रकाशचित्र | |
जन्म: | जुलै २३,१८५६ रत्नागिरी, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत |
मृत्यू: | १ ऑगस्ट, १९२० (वय ६४) पुणे, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत |
चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा |
संघटना: | अखिल भारतीय काँग्रेस |
पत्रकारिता/ लेखन: | केसरी मराठा |
प्रमुख स्मारके: | मुंबई, दिल्ली, पुणे |
धर्म: | हिंदू |
प्रभाव: | शिवाजी महाराज, तात्या टोपे, महाराणा प्रताप |
प्रभावित: | महात्मा गांधी, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर |
वडील: | गंगाधर रामचंद्र टिळक |
आई: | पार्वतीबाई टिळक |
पत्नी: | सत्यभामाबाई |
अपत्ये: | श्रीधर बळवंत टिळक |
तळटिपा: | "स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच." |
टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना "भारतीय असंतोषाचे जनक" म्हटले. त्यांना "लोकमान्य" ही पदवी देखील बहाल करण्यात आली, ज्याचा अर्थ "लोकांनी त्यांचा (नेता म्हणून) स्वीकार केला" असा होतो.महात्मा गांधींनी त्यांना "आधुनिक भारताचा निर्माता" म्हटले.[4]
टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" या त्यांच्या घोषणेसाठी ते ओळखले जातात. टिळकांचे बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय, अरबिंदो घोष, व्ही.ओ. चिदंबरम पिल्लई आणि मुहम्मद अली जिना यांच्यासह अनेक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेत्यांशी घनिष्ट संबंध होते.