महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते
From Wikipedia, the free encyclopedia
भारतरत्न हा १९५४ मध्ये सुरू झालेला भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, जो साहित्य, कला, समाजसेवा, विज्ञान, शिक्षण, क्रीडा, उद्योग या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. महाराष्ट्रातील अनेक व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. सर्वप्रथम १९५८ मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे या मराठी व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला. ते सर्वात वयोवृद्ध भारतरत्न मिळविणारे व्यक्ती सुद्धा आहेत.