महाभारतातील संवाद
From Wikipedia, the free encyclopedia
श्रीकृष्णाची दुसरी पत्नी सत्यभामा हिने स्त्रीने तिचे गृहिणीपद कसे सांभाळावे व पतीची मर्जी कशी संपादन करावी याबाबत द्रौपदीकडून सल्ला घेतला होता. द्रौपदीने एका गृहिणीचे निरनिराळ्या परिस्थितीमधे कसे आचरण असावे, याबाबत सत्यभामेला मार्गदर्शन केले होते. द्रौपदी व सत्यभामेमधील या संवादालाच द्रौपदी-सत्यभामा-संवाद असे म्हणतात. महाभारत या ग्रंथाच्या वन पर्व या तिसऱ्या खंडामधे द्रौपदी सत्यभामा संवादाचे स्वतंत्र असे पर्व ९ व्या क्रमांकावर आहे.