मराठा साम्राज्याच्या टांकसाळी
From Wikipedia, the free encyclopedia
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैदिक राज्याभिषेकाने मराठा साम्राज्याची स्थापना झाली आणि हे साम्राज्य १६७४ - १८१८ पर्यंत अस्तित्वात होते. स्थाप्नेच्याच वेळी महाराजांनी रायगडास टांकसाळ स्थापून तेथून सोन्याचे 'होन' व तांब्याची 'शिवराई' पडून मराठा चलनाची सुरुवात केली.[1][2]
कालांतराने, जसेजसे साम्राज्य वाढत गेले, तसेतसे नव्या टांकसाळी स्थापल्या गेल्या. तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धानंतर यांतील बरीच टांकसाळी स्वतंत्र मराठा संस्थानिकांच्या सत्तेत जाऊन कार्यरत राहिल्या. या कंपनी अथवा ब्रिटिश राज कालीन टांकसाळींचा सदर लेखात उल्लेख केला नाही.