पेरियार
तमिळ समाजसुधारक / From Wikipedia, the free encyclopedia
पेरियार इरोड वेंकट नायकर रामसामी (१७ सप्टेंबर, १८७९ - २४ डिसेंबर, १९७३) हे विज्ञान बोध आणि तर्क विषयाचे क्रांतीकारी विचारक होते. त्यांनी समाजातील अस्पृश्य, पीडित, व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा व समान अधिकार मिळाविण्याचा मार्ग दाखवला. पेरियार एकमेव असे क्रांतीकारक होते की त्यांनी दक्षिण भारतातील राजकारणामधुन ब्राम्हणवादाला सुरूंग लावला आणि समाज व्यवस्था बळकट केली तसेच तमिळनाडूच्या राजकारणात ब्राह्मणेत्तर समाजाला वर्तमान इतिहासातील राजकारणात बरोबरीने बसवले.[ दुजोरा हवा] तामिळनाडू राज्यात आज पण पेरियार रामसामी यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो.[ संदर्भ हवा ]पेरियार यांनी तत्कालीन मद्रास प्रांतात जस्टीस पार्टीची स्थापना केली.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/1/17/PeriyarEVRStamp.jpg)