नरसिंह चिंतामण केळकर
संपादक, निबंधलेखक, नाटककार, चरित्रकार, कादंबरीकार लघुकथा लेखक, कवी, समीक्षक, इतिहासकार, तात्विक / From Wikipedia, the free encyclopedia
नरसिंह चिंतामण केळकर ऊर्फ तात्यासाहेब केळकर (२४ ऑगस्ट, १८७२; मोडनिंब - १४ ऑक्टोबर, १९४७; पुणे) हे मराठी पत्रकार, नाटककार, राजकारणी होते. केसरी वृत्तपत्राचे ते संपादक होते. त्यांच्या प्रकाशित लेखनाची पृष्ठसंख्या १५ हजारांच्या आसपास असून त्यात लोकमान्यांचे चरित्र (३ खंड), मराठे आणि इंग्रज, भारतीय तत्त्वज्ञान, ‘तोतयाचे बंड’ (नाटक) ‘कोकणचा पोर’, ‘बलिदान’ यांसह ८ कादंबऱ्या, आदींचा समावेश आहे. त्यांनी लिहिलेली बहुतेक नाटके संगीत नाटके आहेत. त्यांच्या साहित्यातील या अफाट कामगिरीबद्दल त्यांना साहित्यसम्राट म्हटले जाते.[1]
जलद तथ्य न.चिं. केळकर, जन्म नाव ...
न.चिं. केळकर | |
---|---|
जन्म नाव | नरसिंह चिंतामण केळकर |
जन्म |
२४ ऑगस्ट, इ.स. १८७२ मोडनिंब, सोलापूर |
मृत्यू |
१४ ऑक्टोबर, इ.स. १९४७ पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
धर्म | हिंदू |
कार्यक्षेत्र | इतिहास, नाटक, पत्रकारिता, राजकारण |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कादंबरी, नाटक, चरित्र |
विषय | ऐतिहासिक, राजकीय |
चळवळ | असहकार चळवळ |
प्रसिद्ध साहित्यकृती |
लोकमान्य टिळक यांचे चरित्र मराठे आणि इंग्रज तोतयाचे बंड |
प्रभाव | लोकमान्य टिळक |
अपत्ये | काशिनाथ, कमलाबाई, यशवंत |
बंद करा