दलितत्व
From Wikipedia, the free encyclopedia
हिंदू धर्म समाज व्यवस्थेमध्ये माणसाला माणूस म्हणून स्थान न देता, त्यांच्यात अमानुष अशी विषमता निर्माण करून ठेवली आहे. 'दलितत्त्व' हे या विषमतेचे अपत्य आहे.
त्यांच्यावर या विषमतावादी समाजव्यवस्थेने पिढ्यांपिढ्या अन्याय केला. तेव्हा या अत्याचाराला विरोध करण्यासाठी शब्द आणि साहित्यकलेला शस्त्र बनविले आहे. १९७० च्या आसपास मागासवर्गीय जातींवरील अत्याचारांनी कळस गाठला. पेरुमल समितीने त्याचा स्पष्ट निर्देश केला. हे प्रकरण ( मागासवर्गीय जातींवरील अत्याचार) इतके गंभीर बनले की २४ मे इ.स. १९७२ ला मधु लिमयेंनी लोकसभेत त्याविरूद्ध आवाज उठविला[1].