गजानन दिगंबर माडगूळकर
मराठी गीतकार आणि महाराष्ट्र वाल्मिकी / From Wikipedia, the free encyclopedia
गजानन दिगंबर माडगूळकर(१ ऑक्टोबर १९१९ - १४ डिसेंबर १९७७) हे विख्यात मराठी कवी, गीतकार, लेखक आणि अभिनेते होते. ते त्यांच्या नावाची आद्याक्षरे ग.दि.मा. या नावाने लोकप्रिय आहेत. गदिमांची सर्वात उल्लेखनीय रचना असलेल्या गीतरामायणाची बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. गीतरामायण या त्यांच्या सर्वात उल्लेखनीय कलाकृतीमुळे त्यांना सध्याच्या काळातील आधुनिक वाल्मिकी देखील म्हटले जाते.[1]
गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) | |
---|---|
जन्म नाव | गजानन दिगंबर माडगूळकर |
टोपणनाव | गदिमा |
जन्म |
१ ऑक्टोबर १९१९ शेटफळे, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू |
१४ डिसेंबर, १९७७ (वय ५८) पुणे, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व |
भारतीय ![]() |
कार्यक्षेत्र | साहित्य, चित्रपट |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता, गीत, नाटक, पटकथा, कथा, कादंबरी |
प्रसिद्ध साहित्यकृती | गीतरामायण |
वडील | दिगंबर बळवंत माडगुळकर |
आई | बनुताई दिगंबर माडगुळकर |
अपत्ये | ३ मुले आणि ४ मुली |
टीपा | ग. दि. माडगूळकर संकेतस्थळ |
गदिमांनी त्यांच्या कारकिर्दीत १५७ पटकथा आणि २००० गाणी लिहिली. त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटांसाठी कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. लिखाणासोबत त्यांनी काही चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला.[2]
भारत सरकारने १९६९ मध्ये गदिमांना पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला.[3] १९५७ मध्ये गदिमांना संगीत नाटक अकादमीचा उत्कृष्ट नाट्य लेखक पुरस्कार मिळाला.[4][5] २०१९ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले गेले. हा सोहळा साजरा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विविध कार्यक्रम आणि उत्सव आयोजित केले होते.[6]