गाहा सत्तसई
पुरातन भारतीय कविता संग्रह / From Wikipedia, the free encyclopedia
शालिवाहन राजा हाल(हल) सातवाहन (इसवी सन पूर्व २०० ते इस २०० [ संदर्भ हवा ]) याने केलेल्या गाथारूपी लोककाव्याच्या व काही स्वतः रचलेल्या गाथांच्या एकत्रित संग्रहास गाहा सत्तसई अथवा गाथासप्तशती असे म्हणतात. [1] गाहा सत्तसई हा, इतर संशोधकांसोबतच स.आ. जोगळेकर यांच्या मतानुसार महाराष्ट्री प्राकृत भाषेत असलेला आणि महाराष्ट्रात रचना झालेला कालानुक्रमे आद्यग्रंथ आहे,तर त्याच्या गुणांनी अग्रगण्य आहे.[2] संशोधक डॉ.सुकथनकर यांच्या मतानुसार "गाथा सप्तशती हा प्राकृत वाड्मयातील आद्य व अग्रगण्य ग्रंथ आहे; प्राचीन व बहुमोल सुभाषितांचा संग्रह आहे, साहित्यशास्त्रज्ञांनी त्यातील वचने उद्धृत केली आहेत; रसिक पंडितांनी त्यावर टीका लिहिल्या आहेत."[2]
हा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.
|
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
विकिस्रोतावर काय चालेल ?
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
- ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.
- ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.
- ऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.
गाथासप्तशती मधील प्रत्येक गाथा स्वयंपूर्ण आहे आणि त्यात मानवीय भावना, व्यवहार आणि प्राकृतिक दृष्यांचे अत्यंत सुरस आणि सौंदर्यपूर्ण चित्रण आहे. निसर्गचित्रणात विंध्य पर्वत आणि गोला (गोदावरी) नदीचा पुनःपुनः उल्लेख येतात. खेडी, शेतकऱ्यांचे ग्रामीण जीवन, उपवन, झाड़ी, नदी, विहिरी, तलाव इत्यादीसोबत पुरुष-स्त्रियांचे विलासपूर्ण व्यवहार आणि प्रणयभावनेच विलोभनीय आविष्कार या ग्रंथात आहे.[ संदर्भ हवा ]प्रेमाच्या विविध अवस्थाही मार्मिकपणे शब्दांकित केलेल्या आहेत. ह्या गाथांतून सुंदर निसर्गचित्रेही वैपुल्याने आढळतात. त्यांशिवाय होलिकोत्सव, मदनोत्सव ह्यांसारखे विशेष प्रसंग; तसेच विविध व्रते, आचारादींची वर्णनेही त्यांतून येतात.[1]
महाराष्ट्रातील तत्कालीन समाजजीवनाचे प्रतिबिंब या गाथांतून आढळून येते.[3]